वसईत गोमांस प्रकरणी तपासाची सुत्रे नविन तपास
अधिकारी शिंदे यांच्याकडे!
दै.चौफेर संघर्षच्या बातमी नंतर गोमांस प्रकरणाला नविन वळण
कुणाल जाधव
8976629534
वसई : वसईमध्ये 15 मे रोजी गोमांसच्या वाहतुकीत अटक केलेल्या तीन आरोपींना जामिन मंजूर झाल्याने वसई शहरात (परिसरात) खळबळजनक वातावरण निर्माण झाले होतेे. या प्रकरणी पुढील प्रकाराची शहानिशा होण्याआधीच जामिन मंजूर झाल्याने राज्यात गोमांस बंदीच्या सरकारच्या नियमाला पुन्हा एकदा पायदळी तुडवल्याचे निदर्शनास येते. राज्यात गोमांस बंदी असताना देखील वसईमध्ये शनिवार 15 मे रोजी वसई, अंबाडी रोड, पंचवटी येथे गोमांसाची वाहतूक करणारा टेंपो पकडण्यात आला होता.
काही जागृत नागरिकांमुळे गोमांस विकणार्या तीन आरोपींना अटक करण्यात आले होते. अख्तर शेख, मोहम्मद कुरेशी, बशिर कुरेशी अशी या तीन आरोपींची नावे असून अद्याप फरार असलेला आरोपीचे नाव फिरोज फौजी आहे. या आरोपीवर माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये कलम 5 अ ब क आणि 6 व9 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अचानक त्यांची जामिनावर सुटका झाल्याने परिसरात संभ्रमाचे आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
वसईत गोमांस पकडलेल्या आरोपींना जामिन मंजूर अशी बातमी दै.चौफेर संघर्ष दिनांक 31 मे रोजी प्रसिध्द केली होती. यासंदर्भात तपास अधिकारी शिंदे यांच्याशी सुध्दा संपर्क केला होता परंतु या घटनेला तब्बल 25 दिवस उलटून ही काहीच तपास झालेला नव्हता. म्हणून शिंदे यांच्याकडून तपास काढून साळूंखे यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत. यासंदर्भात साळूंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला हा तपास 1 जून रोजीच दिला असून यासंदर्भात संबंधित गुन्हेगारांना दिनांक 9 जून रोजी पोलिस स्टेशनला हजेरी देण्याकरीता बोलवले असून गाडी कुठून आणली होती? मांस कुठून भरले होते? याची माहिती लवकरच भेटेल.
विशेष म्हणजे गोमांस विक्रीचा हा टेंपो कुठून प्रवास करत आला होता, या टेंपोतील गोमांस कोणत्या कत्तल खाण्यातून आणले आहे. याचा पोलिसांनादेण्यात अद्यापही सुगावा लागलेला नाही. यावरून गोहत्या गोमांस विक्रीचे हे प्रकरण पोलिस गांभिर्याने घेत नसल्याचे कळते.
अधिकारी शिंदे यांच्याकडे!
दै.चौफेर संघर्षच्या बातमी नंतर गोमांस प्रकरणाला नविन वळण
कुणाल जाधव
8976629534
वसई : वसईमध्ये 15 मे रोजी गोमांसच्या वाहतुकीत अटक केलेल्या तीन आरोपींना जामिन मंजूर झाल्याने वसई शहरात (परिसरात) खळबळजनक वातावरण निर्माण झाले होतेे. या प्रकरणी पुढील प्रकाराची शहानिशा होण्याआधीच जामिन मंजूर झाल्याने राज्यात गोमांस बंदीच्या सरकारच्या नियमाला पुन्हा एकदा पायदळी तुडवल्याचे निदर्शनास येते. राज्यात गोमांस बंदी असताना देखील वसईमध्ये शनिवार 15 मे रोजी वसई, अंबाडी रोड, पंचवटी येथे गोमांसाची वाहतूक करणारा टेंपो पकडण्यात आला होता.
काही जागृत नागरिकांमुळे गोमांस विकणार्या तीन आरोपींना अटक करण्यात आले होते. अख्तर शेख, मोहम्मद कुरेशी, बशिर कुरेशी अशी या तीन आरोपींची नावे असून अद्याप फरार असलेला आरोपीचे नाव फिरोज फौजी आहे. या आरोपीवर माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये कलम 5 अ ब क आणि 6 व9 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अचानक त्यांची जामिनावर सुटका झाल्याने परिसरात संभ्रमाचे आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.
वसईत गोमांस पकडलेल्या आरोपींना जामिन मंजूर अशी बातमी दै.चौफेर संघर्ष दिनांक 31 मे रोजी प्रसिध्द केली होती. यासंदर्भात तपास अधिकारी शिंदे यांच्याशी सुध्दा संपर्क केला होता परंतु या घटनेला तब्बल 25 दिवस उलटून ही काहीच तपास झालेला नव्हता. म्हणून शिंदे यांच्याकडून तपास काढून साळूंखे यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत. यासंदर्भात साळूंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला हा तपास 1 जून रोजीच दिला असून यासंदर्भात संबंधित गुन्हेगारांना दिनांक 9 जून रोजी पोलिस स्टेशनला हजेरी देण्याकरीता बोलवले असून गाडी कुठून आणली होती? मांस कुठून भरले होते? याची माहिती लवकरच भेटेल.
विशेष म्हणजे गोमांस विक्रीचा हा टेंपो कुठून प्रवास करत आला होता, या टेंपोतील गोमांस कोणत्या कत्तल खाण्यातून आणले आहे. याचा पोलिसांनादेण्यात अद्यापही सुगावा लागलेला नाही. यावरून गोहत्या गोमांस विक्रीचे हे प्रकरण पोलिस गांभिर्याने घेत नसल्याचे कळते.
No comments:
Post a Comment