Wednesday 28 December 2016

पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात वसईकर करणार नववर्षाचे वेलकम!
पालघर पोलीस कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सज्ज
  • एक दिवसाचा मद्य परवाना न देण्याचा निर्णय -चंद्रशेखर बावनकुळे
  • वसईत पोलिसांचा अतिरिक्त बंदोबस्त 
  • महिलांच्या सेवेसाठी दामिनी पथक
कुणाल जाधव
वसई : थर्टी फस्टला ‘झिंगाट’ होऊन पार्टी करण्याचा विचार करणार्‍या तळीरामांचे यंदाच्या थर्टी फस्ट पार्टीचे वांधे होणार आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने 31 डिसेंबर रोजी एक दिवसाचा मद्य परवाना न देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जे थर्टी फस्टची ‘झिंगणारी’ पार्टी करण्याचे बेत आखत त्यांना हा निराशा देणारा निर्णय ठरणार आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्‍वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच वसई तालुक्यातील पोलीसांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चांगलीच कमर कसली असल्याने थर्टी फस्टला ‘झिंगाट’ होऊन पार्टी करण्याचा विचार करणार्‍या तळीरामांचे यंदाच्या थर्टी फस्ट पार्टीचे वांधे होणार आहेत. यासंदर्भात अप्पर पोलीस अधिक्षक योगेश कुमार यांनी सर्व पोलीस अधिकार्‍यांशी चर्चा करून तसे आदेश सर्व पोलीस स्टेशनना दिले आहेत.   
राज्यातील वाढते रस्ते अपघात विचारात घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार उत्पादन शुल्क विभागाने राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांच्या 500 मीटरच्या आत मद्यविक्री, मद्य उत्पादन व दुकानांची जाहिरात करण्यावर बंदी घातली आहे. महानगरपालिका, शहर, गाव किंवा स्थानिक प्राधिकरणाच्या हद्दीतून महामार्ग जात असल्यास तेथेही बंदी लागू होणार आहे. तसेच 31 मार्च 2017 पासून मद्यविक्री परवान्यांचे नुतनीकरण न करण्याचा निर्णयापाठोपाठ आता थर्टी फस्टच्या रात्री एक दिवसाचा मद्यसेवन परवाना न देण्याचा निर्णय घेऊन उत्पादन शुल्क विभागाने तळीरामांची झिंग उतरवली आहे. थर्टी फस्टचे लोण आता शहरी भागातून ग्रामीण भागाकडे पसरले आहे.
यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने वसईतील सुवी पॅलेसचे मालक विजय पाटील यांना विचारले असता त्यांनी याचा जास्त फटका जे स्वतः जागा घेऊन पार्टीचे आयोजन करतात त्यांना होणार आहे. बड्या हॉटेलना याचा तेवढा फरक पढणार नाही. तसेच तेथे येणार गर्दीही पारिवारीक असते त्यामुळे त्याचा एवढा परिणाम बड्या हॉटेल्सना होणार नाही. असे त्यांनी सांगितले
वसई शहरात मोठ्या प्रमाणावर थर्टी फर्स्टच्या पार्टीचे आयोजन केले जाते. या पार्टीत अनेक तरुण-तरुणी सहभागी होतात. तसेच, 31 डिसेंबरच्या रात्री तरुणाई महामार्गावरील धाबे, हॉटेल्स व क्लबमध्ये जंगी पार्ट्या आयोजित करतात. या पार्ट्यांमध्ये मुख्यत्वे मद्याचे ग्लास रिचवले जातात. मद्यसेवन करुन वाहने चालविल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत थर्टीफस्टच्या रात्री जादा अपघात होतात. त्यामुळे उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 31 डिसेंबरला एक दिवसाचा मद्यसेवन परवाना देऊ नये, असे आदेश या विभागाच्या सर्व अधीक्षकांना दिले आहेत. 
या आदेशाचा सर्वाधिक फटका महामार्गालगत असलेल्या क्लब आणि पंचतारांकित हॉटेल्सना बसणार आहे. या दिवशी तरुणाईच्या पार्ट्या याच ठिकाणी होत असल्यामुळे त्यांना आपला मोर्चा शहराबाहेर वळवावा लागणार आहे. या आदेशाचे उल्लंघन होऊ नये, यासाठी उत्पादन शुल्क विभाग 31 डिसेंबरच्या रात्री महामार्गांलगतचे वाईन शॉप, देशी दारु दुकाने, विदेशी मद्यविक्री दुकाने, धाबे आणि हॉटेल्सवर नजर ठेवणार आहे. यामुळे वसईत ‘झिंगुन’ थर्टी फस्ट साजरे करणार्‍या तळीरामांच्या उत्साहावर यंदा विरजण पडले आहे. 
--------------------------------------------------------------------------------
मद्यसेवन करुन वाहने चालविल्यामुळे इतर दिवसांच्या तुलनेत थर्टीफस्टच्या रात्री जादा अपघात होतात. त्यामुळे 31 डिसेंबरला एक दिवसाचा मद्यसेवन परवाना देऊ नये.
चंद्रशेखर बावनकुळे, उत्पादन शुल्क मंत्री

तुळिंज पोलीस स्टेशन 20 अधिकारी 90 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत फायरब्रिगेट नाका, अचोळा नाका, संतोषभुवन, प्रगतीनगर, चंदन नाका अशा पाच ठिकाणी नाकाबंदी करणार आहेत सहाय्यक पोलीस निरिक्षक राणी पुरी यांच्या अंतर्गत महिलांच्या सेवेसाठी पथक फिरणार आहे. विशेष करुन अपघात होऊ नयेत म्हणुन ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’ वर तात्काळ गुन्हा दाखल केले जाणार आहेत. 
प्रकाश बिराजदार
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तुळिंज पोलीस स्टेशन

कायद्याच्या चौकटीत राहून नवर्षाचे स्वागत करा. वसईत आमच्या हद्दीत असलेल्या सनसिटी व पंचवटी नाका 7 अधिकारी व 40 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत येथे नाका बंदी करण्यात येणार आहे. खास करून ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’वर आमची नजर राहणार आहे. जेणे करुन अपघात कमी होतील.
अनिल पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, माणिकपूर पोलीस स्टेशन

वसई पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बाभोळा व एसटी डेपो अशा 2 ठिकाणी नाका बंदी ठेवण्यात येणार आहे. माझे 5 अधिकारी 25 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत ही नाकाबंदी करण्यात येणार आहे. ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’ साठी माझी स्वता सिविल ड्रेस मध्ये अधिकारी व तात्काळ गुन्हे दाखल करणार आहोत. वसई किल्ल्याचा भाग व सुरुची बाग हा संवेदनशील असल्याने आमची तेथे खास करुन नजर राहणार आहे. तसेच गरज पडल्यास (आरसीपी) दंगल नियंत्रण पथकाचे जवान मागवणार आहे. 
संपद पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वसई पोलीस स्टेशन

वालिव पोलीस स्टेशन 12 अधिकारी 100 कर्मचार्‍यांबरोबर रेंज ऑफिस नाका, वसई फाटा, सातिवली अशा तीन ठिकाणी नाकाबंदी करणार आहेत. मी स्वतः जातिने या नाक्यांवर उपस्थित राहुन लक्ष देणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी वालिव पोलीस स्टेशन खबरदारी घेणार आहे.
महेश पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, वालिव पोलीस स्टेशन

6 अधिकारी 38 कर्मचार्‍यांच्या अंतर्गत ही नाकाबंदी करण्यात येणार आहे. नालासोपारा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघोली नाका, धनंजय नाका, पाटणकर पार्क, हेगवार चौक, गास नाका, सिव्हीक सेंटर अशा 6 ठिकाणी नाका बंदी ठेवण्यात येणार आहे.  ‘ड्रिंक एन्ड ड्राईव्ह’ साठी आमची खास करुन नजर राहणार आहे.
रविंद्र बडगुजर
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, नालासोपारा पोलीस स्टेशन
--------------------------------------------------------------------------------------
तुळींज पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
फायरब्रिगेट नाका, अचोळा नाका, संतोषभुवन, प्रगतीनगर, चंदन नाका

माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
सनसिटी नाका, पंचवटी नाका

वसई पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
बाभोळा नाका, एसटी डेपो नाका

वालिव पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
रेंज ऑफिस नाका, वसई फाटा नाका, सातिवली नाका

नालासोपारा पोलीस स्टेशन हद्दितील नाका बंदी
वाघोली नाका, धनंजय नाका, पाटणकर पार्क, हेगवार चौक, गास नाका, सिव्हीक सेंटर

Monday 12 December 2016


Assistant Police Inspector Rani Puri with Kunal Jadhav


Senior Police Inspector shri. Anil patil with Kunal Jadhav




Senior Police Inspector shri. Prakash Birajdaar with Kunal Jadhav

Tuesday 22 November 2016

वसईतील वाईन शॉप लोकवस्तीतून हद्दपार!
उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कुणाल जाधव
pkunal1990@gmail.com
वसई : दारूबंदी संपुर्ण राज्य भरात लागू झाली पाहिजे ही सामाजिक संघटनांकडून केली जाणारी मागणी तशी जुनीच आहे. शाळा, मंदिर या परिसराच्या किमान 100 मीटर अंतरावर कोणत्याही प्रकारचे दारूचे दुकान असता कामा नये असा राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियम आहे. मात्र असे असतानाही बहुतांश मोक्याच्या ठिकाणाची जागा पाहून दारू विक्रीची दुकाने थाटली जातात. उत्पादन शुल्क विभागाचे नियम धाब्यावर बसविणार्‍यांना अद्दल घडविण्यासाठी राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागानेच आता ठोस पावले उचलली असून गावातील दारुची दुकाने गावकुसाबाहेर हलविण्याचा नवा नियम राज्य शासनाने केला आहे.
राज्य उत्पादन शुल्क खात्याने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामसभेने बहुमताने प्रस्ताव मंजूर केल्यास, दारुचे दुकान गावाबाहेर हलवण्यात येतील, असं उत्पादन शुल्क विभागाने म्हटलं आहे. ग्रामीण भागात दारूची दुकानं लोकवस्तीत असल्याने लहान मुले, महिला यांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे सरकारने 2008 च्या दारूबंदीच्या आदेशात बदल केला आहे, असं उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. 10 पेक्षा कमी घरं असतील त्याठिकाणापासून 100 मीटर अंतरावर आता दारूचे दुकान न्यावे लागेल. दारूचं दुकान लोकवस्तीपासून 100 मीटर दूर स्थलांतर करावे लागेल. त्यासाठी ग्रामसभेत बहुमताने ठराव पारित करावा. स्थलांतराची फी लागणार नाही, मात्र 1 वर्षात स्थलांतर केल. नाही तर दुकानाचा परवाना रद्द होणार आहे. गावात दारुची दुकानं नको अशी गावांमध्ये मागणी होती. गावात लोकवस्तीबाहेर जिथे 10 पेक्षा कमी राहती घरं आहेत, त्यापासून 100 मीटर दूर अंतरावर दारुचे दुकान स्थलांतर करण्याचे हक्क ग्रामसभेला असतील. ग्रामसभेच्या ठरावानंतर दारुचं दुकान स्थलांतर करण्यास वर्षभराचा काळ असेल. ग्रामपंचायत हद्दीतील सर्व मतदारांपैकी बहुमताने ठराव पारित केल्यास, दारुचं दुकान गावाबाहेर हलवावं लागणार.
दारू विक्रीचा रितसर परवाना घेऊन व्यवसाय करणार्‍या व्हाईन शॉप व बियर शॉपच्या मालकांनाही आता या नव्या नियमानुसार आपआपला गाशा गुंडाळावा लागणार आहे. सद्या राज्यातील चंद्रपुर, गडचिरोली व काही जवळच्या जिल्ह्यात संपुर्ण दारू बंदीचा निर्णय झाला आहे. या दारूबंदी आंदोलनाच्या पार्श्‍वभुमीवर राज्य शासनाच्या उत्पादन शुल्क विभागाने घेतलेल्या सदर निर्णयाचे जनमाणसातून कौतुक होत आहे. 
राज्य शासनाने सदर निर्णयाची अंमलबजावणी केली असली तरी दारू विक्रीची दुकाने गावकुसाबाहेर हलविण्याचा सर्वाधिकार स्थानिक पातळीवर ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आला आहे.
 त्यामुळे स्थानिक पातळीवर आता राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निर्णयाचे प्रभावीपणे पालन होते की नाही, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

Tuesday 15 November 2016



वसईतील अचोळे पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राणी पुरी यांची खास मुलाखत...



वसईतील माणिकपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. अनिल पाटील यांची खास मुलाखत...


वसईतील तुळिंज पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक श्री. प्रकाश बिराजदार यांची खास मुलाखत...



राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपअधिक्षक श्री. अविनाश सोंडकर यांची खास मुलाखत...

Thursday 13 October 2016

वसई-विरार महानगरपालिकेच्या खाजगी बसेसना
परिवहन मंत्र्यांचा रेड सिग्नल
परिवहन मंत्र्यांची खाजगी बसेसवर करडीनजर 
वसई-विरार मनपाच्या खाजगी ठेकेदारांची पळताभुई
कुणाल जाधव
मुंबई : वसई-विरार महानगरपालिकेमार्फत खाजगी ठेकेदारांनी सुरु केलेल्या बसेस सेवा बंद करण्यात येर्दल, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी काल पत्रकारांशी बोलताना सांगितले. या खाजगी ठेकेदारांमध्ये काही राजकीय काही राजकीय नेत्यांचे अप्रत्यक्षपणे हित असल्याचे त्यांनी संशय व्यक्त केला आहे. मंत्री रावते जसे बोलतात ते करून दाखवतात त्यामुळे खाजगी ठेकेदारांची चांगलीच पळताभुई झाली आहे.

        वसई तालुक्यातील गेली 60 वर्षे राज्य परिवहन महामंडळाची परिवहन सेवा चालू आहे. विद्यार्थी, वरिष्ठ नागरिक आणि सर्वसामान्यांसाठी महामंडळाची परिवहनाची सेवा म्हणजे एक वरदान आहे. विशेष म्हणजे खाजगी बसेस मधून सेवा करण्यापेक्षा स्त्रियांना महामंडळाच्या बसेसमधून प्रवास सुरक्षित वाटते. यामुळे गावकर्‍यांनी राज्य परिवहनच्या बसेस चालू करण्याची मागणी केल्याने परिवहन मंत्र्यांनी या खाजगी बसेस हटविण्याचा विडा उचलला आहे.
       वसई-विरार भागातील काही गावे महानगर पालिकेतून वगळल्याने सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. ग्रामीण भागातील जनतेच्या मागणीनुसार महाराष्ट्र परिवहन महामंडळाची नालासोपारा आगारातून 16 बसेस आणि वसई आगारातून नऊ बसेस सुरु आहेत. ज्या मार्गावरून बसेस चालू आहेत त्या मार्गावरील काही गावे ग्रामपंचायत हद्दीतच आहेत.
नालासोपारा व वसई आगारातून लांब पल्ल्याच्या प्रवाशांसाठी बसेस सेवा पुरविल्या जातात. परंतु आगारातील काही प्रमाणातील जागा भाड्याने देण्यासाठी वसई-विरार महानगर पालिकेने राज्य सरकारकडे मागणी केल्याने एस.टी. सेवा कालांतरोन हद्दपार होण्याची भिती आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होतील. याकडे नालासोपारा व वसईतील काही सामाजिक संस्थांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांचे लक्ष वेधले आहे.


Thursday 22 September 2016

Harshali Diwali Ank 2015 


Harshali Diwali Ank 2014 


Wednesday 21 September 2016

Thursday 1 September 2016

कर्तव्याचा आणखी एक बळी
वाहतुक पोलीस विलास शिंदे यांचे निधन

कुणाल जाधव
8976629534
मुंबई : आठ दिवसांपासून मृत्यूशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली आणि पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदेंची प्राणज्योत मालवली. 23 ऑगस्टला कर्तव्य बजावत असताना विलास शिंदेंना दोन मुलांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती.
विलास शिंदेंची नेत्रदान करण्याची इच्छा होती, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे. मात्र शवविच्छेदनानंतर त्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल. शवविच्छदानानंतर शिंदेंचं पार्थिव त्यांच्या वरळीतील राहत्या घरी आणले जाणार आहे.

विलास शिंदेंना केलेल्या मारहाणीचे कारण काय तर विनाहेल्मेट दुचाकी चालवणार्‍याला थांबवले आणि लायसन्सची मागणी केली. पण गुंडांच्या मारहाणीत एकट्या विलास शिंदेंचा मृत्यू झाला नाही तर इथली कायदा आणि सुव्यवस्था किती मरणासन्न अवस्थेत आहे, याचे दर्शन घडले.
विलास शिंदेंना मारहाण करणारा आरोपी अहमद महमद अली कुरेशीसह त्याच्या अल्पवयीन भावाला अटक केली आहे. पण त्यामुळे विलास शिंदेंचा गेलेला जीव पुन्हा परत येणार नाही. मतांच्या राजकारणासाठी मुस्लिम टोळक्याला हात लावला जात नाही, असा आरोप करत राज ठाकरेंनी मारहाण प्रकरणाला धार्मिक रंग दिला आहे. 
देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यापासून क्राईम रेट कमी झाल्याचा दावा मोठ्या आवेशात करतात. पण थेट वर्दीवर हात टाकण्याच्या घटना वाढल्या आहेत. शशिकांत कालगुडेनं महिला कॉन्स्टेबलला बेदम मारहाण केली होती. तुमसरच्या आमदाराने पोलीस शिपायाच्या कानशिलात भडकावली होती. तर आमदार सुरेश लाड यांनी उपजिल्हाधिकार्‍याच्या अंगावर हात उचलला होता. 
अशा घटनांमुळे छोट्या-मोठ्या गावगुंडांची हिंमत वाढते आणि ते सहज पोलिसांवर हात उचलतात. त्यामुळेच विलास शिंदेंचा बळी गेला आहे. आता तरी देवेंद्र फडणवीसांनी आकडेमोकड करत आधीच्या सरकारवर खापर फोडण्यापेक्षा गांभीर्याने विचार करावा आणि पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत होणार नाही. अशा कायद्याचा धाक निर्माण करावा. हीच विलास शिंदेंना खरी श्रद्धांजली ठरेल. 
...........................................
मुख्यमंत्र्यांना घेराव
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलास शिंदे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी वरळीमधील पोलीस कॉलनीत गेले होते. यावेळी पोलीस कॉलनीतील महिलांनी मुख्यमंत्र्यांना घेराव घालत रोष व्यक्त केला.
...........................................
25 लाखांची मदत
विलास शिंदे यांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा गृहराज्य मंत्री दीपक केसरकर यांनी केली. तसेच त्यांच्या कुटुंबातील एका नातेवाईकाला नोकरी देण्याचे आश्वासनही सरकारने दिले आहे.
...........................................
      हि घटना अतिशय निंदनीय आहे. पोलीसदलातर्फे याचा निषेध आहे. ही प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे त्याच्या भावाने निर्दयीपणे केले हा हल्ला विलास शिंदे सेवेत कार्यरत असताना होणे ही मोठी दुर्दैवाची बाब आहे. त्यामुळे तो मुलागा अल्पवयीन असतानाही त्या मुलाला गाडी दिल्याबद्दल त्याच्या घरातील जबाबदार व्यक्तीवर सुध्दा गुन्हा दाखल करण्यात आला पाहिजे.
अनिल पाटील
वरिष्ठ पोलीस निरिक्षक (माणिकपूर पोलीस स्टेशन)

Wednesday 31 August 2016

सतीश माथूर राज्याचे नवे पोलीस महासंचालक
“सुखरुप जनता आणि सुरक्षित महाराष्ट्र’ हे माझे कर्तव्य आणि मिशन आहे”

कुणाल जाधव
8976629534

भारतीय पोलिस सेवेतील वरिष्ठ अधिकारी सतीश माथूर यांची राज्याचे नवे पोलिस महासंचालक म्हणून नियुक्ती केली. माथूर सध्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीचे महासंचालक म्हणुन काम पाहत होते.
राजकीय नेत्यांपेक्षाही महाराष्ट्रातल्या कर्तबकार पोलीस आणि प्रशासकीय आय. ए. एस. आणि आय.पी. एस्. अधिकार्‍यांची परंपरा अधिक गौरवशाली आणि अभिमानास्पद आहे. इतर राज्यांबाबत असे ऐकायला मिळते की तेथील अधिकार्‍यांवर राजकीय नेत्यांचा वरचष्मा, दबाव आणि हस्तक्षेप वाजवीपेक्षा जास्त असतो. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक म्हणून नुकतीच सतीश माथूर यांनी सूत्रे हाती घेतली आहेत. 
सतीश माथूर यांना महाराष्ट्र, तळहातावरच्या रेषांसारखा, परिचित असावा. ते प्रत्येक पक्षाच्या हर एक नेत्याला जाणून आहेत. राजकीय अंतःप्रवाहांचा त्यांचा प्रदीर्घ अभ्यास आहे. महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक चळवळी, आंदोलने, संघर्ष आणि समीकरणे, त्यांनी वेळोवेळी जवळून, पाहिली, अनुभवली आहेत. पक्षांची आणि नेत्यांची ‘बलस्थाने’ आणि ‘कच्चे दुवे’ त्यांना ठाऊक असल्याने त्यांना कशा पद्धतीने हाताळून शांतता तसेच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखायची याची त्यांना कल्पना आहे. 
एकेकाळी मुंबईत ‘अंडरवर्ल्ड’ आणि मुंबईबाहेर ‘क्रिमिनल गँगस्टर्स’चे आव्हान पोलीस दलापुढे होते. 
मुंबईतल्या उद्योग, व्यापार, व्यवसायातील सधन लोकांना होणारा ‘खंडणी’चा उपद्रव ही एक समस्या पूर्वी होती, आता त्याची तीव्रता कमी झालेली असली तरी खंडणीसाठी धमक्या-अपहरण-खून हा विषय संपलेला नाही.
महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्याकडून महाराष्ट्रातील जनतेच्या विशेष अपेक्षा आहेत कारण आजवरची त्यांची कामगिरी ‘विशेष’ आहे आणि व्यक्ती म्हणूनही सतीश माथूर ‘विशेष’ आहेत. 
सतीश माथूर यांना अनुकूल अशा काही गोष्टी आहेत, त्यातली एक म्हणजे त्यांचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्यांना स्वातंत्र्य देणारे, लोकहिताच्या निर्णयात पाठराखण करणारे आणि अकारण, अवाजवी हस्तक्षेप न करणारे आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘सुखी’ महाराष्ट्राचे स्वप्न, डी.जी. सतीश माथूर यांनी सांभाळलेल्या ‘शांत’ महाराष्ट्रातच साकार होऊ शकणार आहे. त्यामुळेच देवेंद्रांनी सतीश माथूर यांची एका विश्वासाने या पदावर नियुक्ती केली आहे. 
सुदैवाने मुंबईत दत्ता पडसलगीकरांसारखे समर्पित आणि सम्यक व्यक्तिमत्वाचे पोलीस आयुक्त आहेत तर महाराष्ट्राचे महासंचालक सतीश माथूर यांच्यासारखे ‘रोल मॉडेल-आयकॉनिक-अ‍ॅडमिनीस्ट्रेटर’ आहेत त्यामुळे पोलीस दलाबद्दलची विश्वासार्हता वादातीत आहे. ‘दिल्या शब्दाला जागणारं, चारित्र्यसंपन्न नेतृत्व’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रुपाने राजकीय क्षेत्रात लाभलेले असताना, मुंबई आणि महाराष्ट्रातील पोलीस दलाची सूत्रे दत्ता पडसलगीकर आणि सतीश माथूर यांच्यासारख्या कर्तृत्ववान प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हाती असावीत ही गोष्ट महाराष्ट्राला निश्चित आणि निर्धास्त करणारी आहे.

Thursday 18 August 2016

मंडप उभारा.. वाहतूक रोखा
पालिकेच्या बोटचेप्या धोरणामुळे गणेशोत्सव मंडळांना कायद्याचा धाक नाही

कुणाल जाधव
8976629534
     वसई : ‘रस्त्यावर मंडप उभारा आणि वाहतुकीस अडथळा करा’ अशी उत्सवाची नवी परंपरा वसई-विरार मध्ये गेल्या काही वर्षांपासून रजू लागली असून रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सवाचे मंडप उभारण्याची परवानगी असतानाही त्याहून अधिक जागेवर अनेक मंडळांनी मंडप उभारल्याने शहरातील वाहतुकीचा प्रश्न यावर्षीही ऐरणीवर आला आहे. मागील वर्षी विनापरवाना उभारणार्‍या, तसेच परवानगी घेतल्यानंतर अटी व शर्तींचे पालन न केलेल्या सार्वजनिक मंडळांचे मंडप यंदा उभे राहू देऊ नये, अशा सूचना न्यायालयाने पालिकांना दिल्या आहेत.तसेच  उच्च न्यायालयाने राज्यांतील सर्वच महापालिकांना त्यांच्या हद्दित मंडप धोरण ठरवण्याचे आदेश दिले आहेत.
     वसई-विरार महानगरपालिकेच्या बोटचेप्या धोरणामुळे गणेशोत्सव मंडळांना कायद्याचा धाक उरलेला नाही. त्यामुळे नियम धाब्यावर बसवून उत्सव साजरा करण्याची परंपरा’ यंदाही वसई-विरार मध्ये कायम राहाण्याची चिन्हे असून नियम मोडणार्‍यांमध्ये राजकीय नेत्यांनी यंदाही आघाडी घेतल्याचे चित्र आहे. 
    यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने वसई-विरार महानगर पालिकेचे आयुक्त सतिष लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते पुर्णपणे पाळले जातील. ज्या मंडळांनी मागील वर्षी अटी व शर्तींचे पालन केले नाही त्यांना मंडप उभारु देणार नाही. जे जे माननीय उच्च न्यायालयाचे प्रचलित नियम व आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई होईल.”
रस्ते अडवून, वाहतुकीला अडथळा करून उत्सव साजरे करण्यात वसईतील वेगवेगळी उत्सव मंडळे सुरुवातीपासून अग्रेसर राहिली आहेत. दहिहंडी उत्सवात आवाजाचा दणदणाट करायचा, गणेशोत्सवात रस्ते, चौक अडवून मंडपे उभारायची, असे प्रकार वसईकरांना नवे नाहीत. वसई शहरातील काही रस्ते मुळात अरुंद असल्यामुळे अनेक ठिकाणी या रस्त्यांच्या रुंदीकरणास फारसा वाव नाही. वाहनांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने शहराला वाहतूक कोंडीचा विळखा बसला आहे. असे असताना वसई शहरातील वेगवेगळ्या भागांत रस्ते अडवून उत्सव साजरे करण्यात येत असल्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडू लागल्याचे चित्र आहे. न्यायालयाने रस्त्यावर उत्सव साजरे करण्यासंबंधी काही र्निबध घातले असून त्याचे उल्लंघन सर्रासपणे गणेशोत्सव मंडळांकडून होताना दिसून येते. न्यायालयाच्या आदेशानुसार रस्त्याच्या एकतृतीयांश जागेवर गणेशोत्सव मंडप उभारण्याची परवानगी महापालिकेकडून मंडळांना देण्यात येते. अनेक गणेशोत्सव मंडळे एकतृतीयांशपेक्षा जास्त जागेवर मंडप उभारून वाहतुकीस अडथळा निर्माण करतात. तसेच विद्युत रोषणाईसाठी नवेकोरे रस्ते खोदतात. असे चित्र यंदाही शहरात दिसून येत असून त्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे.
............................................................................................
“उच्च न्यायालयाने जे आदेश दिले आहेत ते पुर्णपणे पाळले जातील. ज्या मंडळांनी मागील वर्षी अटी व शर्तींचे पालन केले नाही त्यांना मंडप उभारु देणार नाही. जे जे माननीय उच्च न्यायालयाचे प्रचलित नियम व आदेश असतील त्याप्रमाणे कारवाई होईल.”
-सतिश लोखंडे
आयुक्त, वसई विरार महानगर पालिका

“पोलीस पालिकेची परवानगी पाहिल्यानंतरच नहरकत प्रमाणपत्र देतात तसेच पोलीस फक्त लाऊडस्पिकरची परवानगी देत असतात. मुळात जेथे मंडप बांधले जातात ती जागा पालिकेची असते. त्यामुळे सर्व प्रथम जबाबदारी ही पालिकेची असते. त्यामुळे पालिकेने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.”
-प्रकाश बिराजदार
वरिष्ठ पोलीस निरिक्षक, तुळिंज पोलीस ठाणे
............................................................................................
पदपथ अडवणारे मंडप नकोच
‘रस्ते, पदपथांची अडवणूक करणार्‍या उत्सवी मंडपांना परवानगी देण्यात येऊ नये’, असेही न्यायालयाने पुन्हा एकदा बजावले. ‘संबंधित यंत्रणेच्या परवानगीशिवाय आयोजकांनी उत्सवी मंडप उभे करु नयेत, त्यासाठी खड्डे खणू नयेत वा उत्सवादरम्यान व्यावसायिक जाहिराती प्रसिद्ध करु नयेत’, असे न्यायालयाने बजावले आहे. 

त्या अधिकार्‍यांवर कारवाई करा : न्यायालय
‘ध्वनिप्रदूषणाबाबतच्या नागरिकांच्या तक्रारींना केराची टोपली दाखवून त्यांच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्यास असमर्थ ठरणार्‍या अधिकार्‍यांवर सरकारने कारवाई करावी’, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. याशिवाय ‘मशिदींवर भोंगे लावणे हा मूलभूत अधिकारच असल्याचे सांगत सामान्य माणसाच्या शांततापूर्ण झोपेचा अधिकार हिरावून घेतला जाऊ शकत नाही आणि हे न्यायतत्व सर्वांसाठी तेवढेच लागू आहे.’, याचा न्यायालयाने पुनरुच्चार केला. 

Monday 25 July 2016

वसईकरांना खाद्य पदार्थ लागेना गोड!
वसई विरार महानगपालिकेला स्थापन होऊन तब्बल 7 वर्षे होऊन एकही खाद्य पदार्थ दुकानांचा सर्वे नाही!
अस्वच्छ मिठाई दुकानांवर एफडीएची नजर जाणार का?
पालिकेचा आरोग्य विभाग नागरिकांच्या आरोग्याबाबतीत उदासीन!

कुणाल जाधव
8976629534

वसई : अस्वच्छतेमुळे नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स’ या दुकानातील खाद्य विक्रीवर एफडीएने बंदी घातली आहे. अशी कारवाई वसईतील स्वीट्स मार्ट वर कधी होणार... वसईमध्ये आज प्रत्येक नाक्यावर स्विटमार्ट आहेत. पण यातील एकाही स्वीटमार्ट कडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही... वसई महानगपालिकेला 7 वर्षे पुर्ण होऊनही आज पालिकेकडे फुड इंन्सपेक्टर नाही. पावसाळ्यात वसई-विरारमध्ये अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. या संदर्भात पालिका उदासीन दिसत आहे.

यासंदर्भात ‘दै. चौफेर संघर्ष’ने आरोग्य विभागातील एका अधिकार्‍याशी संपर्क साधला असता त्यांनी असे सांगितले की, “वसई-विरार महानगरपालिकेकडून आज पर्यत कधीच असा सर्वे झाला नाही. पालिकडे फुड इन्सपेक्टरच नाही आहे. त्यासाठी फुड इन्सपेक्टरची गरज आहे. ‘मावा’ खराब आहे किंवा ‘मिठाई’ खराब आहे हे आम्ही सांगू नाही शकणार. त्यासाठी दिड वर्षाचे प्रशिक्षण असते आणि असे प्रशिक्षण कोणी घेतलेले नाही. आम्हाला अजुन तशा काही सुचना ही नाही आल्यात आज पर्यत आणि आम्ही असा सर्वे कधी केला नाही”
समोरून चांगल्या दिसणार्‍या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात.  सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.  
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे नवी मुंबई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.

वसई-विरार महानगरपालिकेकडून आज पर्यत कधीच असा सर्वे झाला नाही. पालिकडे फुड इन्सपेक्टरच नाही आहे. त्यासाठी फुड इन्सपेक्टरची गरज आहे. ‘मावा’ खराब आहे किंवा ‘मिठाई’ खराब आहे हे आम्ही सांगू नाही शकणार. त्यासाठी दिड वर्षाचे प्रशिक्षण असते आणि असे प्रशिक्षण कोणी घेतलेले नाही. आम्हाला अजुन तशा काही सुचना ही नाही आल्यात आज पर्यत आणि आम्ही असा सर्वे कधी केला नाही
जितेंद्र नाईक
आरोग्य अधिकारी
वसई विरार महानगर पालिका

पालिकेचे जे आज काम चालले आहे. ते अक्षरश: बहुजन विकास आघाडी प्रायव्हेट लिमीटेड कंपनीसारखे काम चालू आहे. ज्या कामातून पैसा भेटेल अशाच कामाकडे लक्ष देणे...! असा प्रकार चालू आहे. ‘आम्ही करु सो कायदा!’ असे वातावरण महानगर पालिकेत पहावयास मिळते. पालिका व सत्ताधारी पक्ष बहुजन विकास आघाडीला लोकांच्या आरोग्याशी काही घेणं देणं नाही
उत्तम कुमार
अध्यक्ष
भारतीय जनता पार्टी (वसई रोड)


मी विरोधी पक्ष नेता असताना या संदर्भात एक वर्षापुर्वी आयुक्तांना पत्र दिले होते. एफडीए चे कार्यालय ठाण्याला असुन तेथील तेथील एकच अधिकारी सर्व काम संभाळतो. त्यांची ताकद इतकी अपुरी आहे की, वसईत अनेक पाण्याच्या बेकायदेशीर फॅकटरी आहेत. अशुध्द पाणी नागरीकांना पाजले जात आहे. तसे पत्र ही मी आयुक्तांना दिले होते. त्यावेळी मी मागणी केली होती की, पालिकेचाच एक अधिकारी एफडीएवर असावा अशी मागणी केली होती. त्यासंदर्भात मी पाठपुरावाही केला होता. त्यांसदर्भात मी मंत्री सुभाष देसाईंना ही भेटलो होतो. या संदर्भा पालिकेने लक्ष देणे गरजेचे आहे.
विनायक निकम
माजी विरोधी पक्ष नेता


गेल्या 7 वर्षात सर्वे झाला की नाही मला माहिती नाही, पण यावेळी आम्ही प्रभाग आय मध्ये प्रत्येक हॉटेल व मिठाई खाद्यपदार्थ दुकानांना पावसाळ्यासंदर्भात घ्यावयाच्या काळजी संदर्भात नोटीस पाठवल्या असून त्यासंदर्भात आमचे एस आय विकास पाटील वेळोवेळी पहाणी करत असतात
प्रविण शेट्टी
सभापती (प्रभाग आय)

Sunday 24 July 2016

वसईकरांना मिठाई लागेना गोड!

अस्वच्छ मिठाई दुकानांवर एफडीएची नजर जाणार का?
पालिका विभागाला जाग कधी येणार?

कुणाल जाधव
8976629534



वसई : अस्वच्छतेमुळे नवी मुंबईतील ‘बिकानेर स्वीट्स’ या दुकानातील खाद्य विक्रीवर एफडीएने बंदी घातली आहे. अशी कारवाई वसईतील स्वीट्स मार्ट वर कधी होणार.. वसईमध्ये आज प्रत्येक नाक्यावर स्विटमार्ट आहेत. पण यातील एकाही स्वीटमार्ट कडे पालिकेने कधी लक्ष दिले नाही... वसई-विरार महानगरपालिकेकडे अनधिकृत बांधकाम या विषया शिवाय कोणता विषय नाहीच असे कोणी ही सांगेल. या पावसाळ्यात वसई-विरारमध्ये अनेक आजारांनी डोके वर काढले आहे. या संदर्भात पालिका वसईतील स्वीट्स मार्टस च्या दुकांनाची पहाणी करणार का असा प्रश्‍न नागरिकांमध्ये सतावत आहे.

समोरून चांगल्या दिसणार्‍या दुकानांना खवयय्ये नेहमीच भेट देतात. अनेक दुकानांमध्ये खाण्याचे पदार्थ सजवून ठेवलेले असतात. पण हे पदार्थ ज्या ठिकाणी तयार केले जातात तिथे मात्र नियमाची खुलेआमपणे पायमल्ली केली जाते. पावसाळ्यात दूषित अन्नपदार्थातून आजार पसरतात.  सर्वाना चांगले, हेल्दी खाणे मिळावे यासाठी एफडीए दुकानाची पाहणी करत आहे. या पाहणीत नवी मुंबईतील बिकानेर स्वीट्स या दुकानाचे हे वास्तव समोर आले आहे.  
नवी मुंबईतील डी. वाय. पाटील कॉलेज समोरील बिकानेर स्वीट्सच्या दुकानातील स्वयंपाकघरात अतिशय अस्वच्छता असून अशा वातावरणात बनलेले अन्नपदार्थ ग्राहकांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतात. याचमुळे एफडीएने या दुकानावर कारवाई करत त्यांना अन्नपदार्थांची विक्री करण्यास बंदी घातली आहे. पुढच्या काही दिवसात सणासुदीचे दिवस सुरु होणार आहेत त्यामुळे हि कारवाई सुरु केली असल्याचे नवी मुंबई एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश देशमुख यांनी सांगितले.

Monday 4 July 2016

वसईत मॉडेलिंगच्या आमिषाने बलात्कार करणार्‍याला अटक
मोठ्या शिताफिने तुळींज पोलिसांना आरोपीला पकडण्यात यश

कुणाल जाधव
8976629534

वसई ः मॉडेलिंगचे आमिष दाखवून अनेक तरुणींवर बलात्कार करणार्‍या एका युवकाला अटक करण्यास तुळींज पोलिसांना अखेर यश आले आहे. तुळींज पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची संपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश बिराजदार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने मोठ्या शिताफीने या नराधमाची धरपकड केली. संदीप यादव असे या आरोपीचे नाव आहे. 
वेगवेगळ्या नावाने तो फेसबूकवर अकाऊंट चालवत असल्याची तक्रारही त्याच्याविरोधात आहे. आरोपी संदीप हा अनेक फेसबुकचे अकाऊंट चालवत होता. फेसबुकवरुन तो तरुणींशी संपर्क साधायचा व त्यांना मॉडेलिंगचे आमिष दाखवायचा. तो युवतींना फोटोशूटसाठी समुद्र किनार्‍यावर बोलवून घ्यायचा.
समुद्र किनार्‍यावर खाण्याच्या बहाण्याने तो मुलींना गुंगीचे औषध द्यायचा. त्यानंतर तरुणींचे न्यूड फोटोशूट करुन त्यांच्यावर बलात्कार करायचा. मात्र अखेर त्याच्या पापाचा घडा भरलाच आणि त्याच्या या काळ्या कृत्याचा एका युवतीने पर्दाफाश केला. युवतीने मॉडेल बनायचे सांगून संदीपला बोलावून घेतले. प्लॅननुसार त्याला पोलिसांच्या जाळ्यात अडकवले. मॉडेलिंगचे आमिष दाखवून
या नराधमास पकडण्याची संपूर्ण कारवाई तुळींज पोलिस स्थानकाचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रकाश बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली असून त्यांनी केलेल्या या कारवाईमुळे सगळ्याच पीडित मुलींना न्याय मिळाला आहे. त्याचप्रमाणे भविष्यात या नराधमाला बळी जाण्यापासून अनेक मुली बचावल्या आहेत.
तरुणींची आर्थिक फसवणूक व लैंगिक शोषण करणारा 25 वर्षीय आरोपी संदीप यादव हा नालासोपारा येथे राहातो. मुलींच्या अश्‍लील चित्रफिती इंटरनेटवर अपलोड करण्याची धमकी देत तो मुलींना ब्लॅकमेल करत होता. दोन मुलींच्या तक्रारीनंतर तुळींज पोलिसांना त्याला बलात्कार, फसवणूक, सायबर अ‍ॅक्ट, पोक्सो आदी गुन्ह्यांतर्गत अटक केली आहे. 

''

मुंबईसारख्या झगमगत्या चित्रनगरीची भुरळ पडून अनेक जण आपले नशीब आजमावण्यासाठी मुंबईत येत असतात. मात्र येथे चित्रपटाच्या नावाने फसवणार्‍यांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे सिनेसृष्टीत काम करायला येणार्‍यांनी योग्य ती माहिती काढूनच, आपल्या कुटुंबियांना याबाबत इत्यंभूत कल्पना देऊनच काम करावे.
-प्रकाश बिराजदार, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, तुळिंज पोलीस स्टेशन

''

Friday 1 July 2016

Harshali Magazine Inaugrated By Hon. Governer Of Maharashtra C. Vidyasagar Rao.




हर्षाली अंकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे राज्यपाल (गर्वनर) श्री. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले तो सुवर्णक्षण...


Tuesday 28 June 2016

kunal jadhav with group editor mumbai mitra/ vrutt mitra abhijeet rane & famous singer udit narayan


Kunal jadhav with saion mla Tamil selvan & uttam kumar (bjp president, vasai road)


सायनचे आमदार श्री तामिळ सेलवन यांच्या सोबत...

narayan rane


हर्ष प्रकाशनाचे संचालक व हर्षाली मासिकाचे सल्लागार संपादक श्री. प्रकाश जाधव महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ट नेते श्री. नारायण राणे यांना अंक भेट देताना सोबत काँगे्रसचे वरिष्ठ नेते...

kunal jadhav with prakash birajdar


हर्ष प्रकाशनाचे संचालक व हर्षाली मासिकाचे संपादक कुणाल जाधव वरिष्ठ पोलीस निरिक्षक
श्री. प्रकाश बिराजदार यांना अंक भेट देताना...

kunal jadhav with mumbai congress president sanjay nirupam



मुंबई काँग्रेस तर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिना निमित्त आयोजीत केलेल्या कार्यक्रमात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या हस्ते हर्षालीचे संपादक कुणाल जाधव यांचा सत्कार करण्यात आला.

kunal jadhav with mla hitendra thakur & vvmc first mayor rajiv patil


वसईचे आमदार व बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्रजी ठाकुर व वसई-विरार महानगर पालिकेचे प्रथम महापौर राजीवजी पाटील यांच्या समवेत...

Friday 24 June 2016

   वसईत गोमांस प्रकरणी तपासाची सुत्रे नविन तपास

   अधिकारी शिंदे यांच्याकडे!







दै.चौफेर संघर्षच्या बातमी नंतर गोमांस प्रकरणाला नविन वळण 

कुणाल जाधव
8976629534

वसई : वसईमध्ये 15 मे रोजी गोमांसच्या वाहतुकीत अटक केलेल्या तीन आरोपींना जामिन मंजूर झाल्याने वसई शहरात (परिसरात) खळबळजनक वातावरण निर्माण झाले होतेे. या प्रकरणी पुढील प्रकाराची शहानिशा होण्याआधीच जामिन मंजूर झाल्याने राज्यात गोमांस बंदीच्या सरकारच्या नियमाला पुन्हा एकदा पायदळी तुडवल्याचे निदर्शनास येते. राज्यात गोमांस बंदी असताना देखील वसईमध्ये शनिवार 15 मे रोजी वसई, अंबाडी रोड, पंचवटी येथे गोमांसाची वाहतूक करणारा टेंपो पकडण्यात आला होता.

काही जागृत नागरिकांमुळे गोमांस विकणार्‍या तीन आरोपींना अटक करण्यात आले होते. अख्तर शेख, मोहम्मद कुरेशी, बशिर कुरेशी अशी या तीन आरोपींची नावे असून अद्याप फरार असलेला आरोपीचे नाव फिरोज फौजी आहे. या आरोपीवर माणिकपूर पोलीस स्टेशन मध्ये कलम 5 अ ब क आणि 6 व9 या कलमांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र अचानक त्यांची जामिनावर सुटका झाल्याने परिसरात संभ्रमाचे आणि संतापजनक वातावरण निर्माण झाले आहे.

वसईत गोमांस पकडलेल्या आरोपींना जामिन मंजूर अशी बातमी दै.चौफेर संघर्ष दिनांक 31 मे रोजी प्रसिध्द केली होती. यासंदर्भात तपास अधिकारी शिंदे यांच्याशी सुध्दा संपर्क केला होता परंतु या घटनेला तब्बल 25 दिवस उलटून ही काहीच तपास झालेला नव्हता. म्हणून शिंदे यांच्याकडून तपास काढून साळूंखे यांच्याकडे तपासाची सूत्रे देण्यात आली आहेत. यासंदर्भात साळूंखे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी मला हा तपास 1 जून रोजीच दिला असून यासंदर्भात संबंधित गुन्हेगारांना दिनांक 9 जून रोजी पोलिस स्टेशनला हजेरी देण्याकरीता बोलवले असून गाडी कुठून आणली होती? मांस कुठून भरले होते? याची माहिती लवकरच भेटेल.

विशेष म्हणजे गोमांस विक्रीचा हा टेंपो कुठून प्रवास करत आला होता, या टेंपोतील गोमांस कोणत्या कत्तल खाण्यातून आणले आहे. याचा पोलिसांनादेण्यात अद्यापही सुगावा लागलेला नाही. यावरून गोहत्या गोमांस विक्रीचे हे प्रकरण पोलिस गांभिर्याने घेत नसल्याचे कळते.
वसईत गोमांस पकडलेल्या तिन्ही गुन्हेगारांना जामिन मंजूर

पोलीस स्टेशनचा तपास संथ गतिने
भाजपा व सर्व हिंदुत्ववादी संघटना यांबाबतीत आंदोलन करणार
खासदार चिंतामण वनगा 1 जुन रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनला भेट देणार

कुणाल जाधव
8976629534

वसई : राज्यात गोहत्या बंदी असतानाही वसईमध्ये दिनांक 15 मे रोजी शनिवारी गोमांसाची वाहतूक करणारा एम. एच. 01. एलए. 3808 या क्रमांकाचा टेंपो पकडला गेला होता. काही जागरूक नागरिकांनी हा टेंपो पकडून दिला यावेळी पोलीसांनी चार आरोपीं पैकी तीन आरोपींना अटक केली होती. परंतू तिन्ही गुन्हेगारांना जामिन मंजूर झाला आहे. तसेच अजुन तपासात टेंपो कुठुन आला होते. कोणता कत्तल खाना होता हे ही पोलीस शोधू शकलेले नाहीत. यासंदर्भात माणिकपूर पोलीस स्टेशनच्या संथ चौकशीवर भारतीय जनता पार्टी आंदोलन करणार आहे अशी माहिती वसई रोेडचे भाजपा अध्यक्ष उत्तम कुमार यांनी सांगितले. याप्रकरणा संदर्भाथ पालघर जिल्हयाचे खासदार चिंतामन वनगा माणिकपूर पोलीस स्टेशनला भेट देणार आहेत. हि घटना सकाळच्या सुमारास झाली होती. वसईतील अंबाडी रोड, पंचवटी नाक्यावर हा टेंपो पकडण्यात आला होता.


माणिकपूर पोलीस स्टेशन कलम 5 अ ब क, 6 व 9 या कलमांखाली गुन्हा दाखल करुन अटक केली होती त्यातील तिनही आरोपींना जामिन मंजूर झाला आहे. यासंदर्भात ‘दै.चौफेर संघर्ष’ने तपास अधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी “तिघांनाही जामिन भेटला आहे. चौकशी चालू आहे. आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनला त्या तिघांना हजेरी लावली आहे. नेमके हे मास कुठुन आणले आहे कुठे घेऊन जात होते याचा तपास चालू आहे. सध्या काही नाही! चौकशी चालू आहे. आपल्याकडे अजुन तेवढे पुरावे नाहीत.” असे त्यांनी सांगितले. फरार आरोपी संदर्भात विचारले असता ‘तिनही आरोपी चौथा नव्हता असे सांगतात’ असे पोलीसांनी सांगितले.
अख्तर अब्बास शेख (रा. काशिमिरा), मोहमद ईस्माईल कुरेशी (रा. दांडगेवाडी, गास) व बशिर अहमद अब्दूल कादीर कुरेशी (रा. दांडगेवाडी, गास) असे गुन्हेगारांची नावे होती तर फरार आरोपीचे नाव फिरोज फौजी (रा. वाझा मोहल्ला, सोपारा) असे आहे.

.................................................................

तिघांनाही जामिन भेटला आहे. चौकशी चालू आहे. आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनला त्या तिघांना हजेरी लावली आहे. नेमके हे मास कुठुन आणले आहे कुठे घेऊन जात होते याचा तपास चालू आहे. सध्या काही नाही चौकशी चालू आहे.आपल्याकडे अजुन तेवढा पुरावा नाही. आम्ही जे संपुर्ण पुराव्यासहीत चार्जशीट त्यांच्यावर टाकणार आहोत त्यात थोडीही हयगय करणार नाही.
-शिंदे
सहाय्यक पोलीस निरिक्षक, माणिकपूर पोलीस स्टेशन

....................................................................................

या प्रकरणावर सशक्त कारवाई झाली पाहिजे. माणिकपूर पोलीस स्टेशनने ह्या प्रकरणाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे यासाठी आमचा पक्ष व सर्व हिंदुत्ववादी संघटना सामिल होऊन तिव्र आंदोलन करणार आहे. यासंदर्भात पालघर जिल्ह्याचे खासदार चिंतमाण वनगा 1 जुन रोजी माणिकपूर पोलीस स्टेशनला भेटून या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.
-उत्तम कुमार
अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी (वसई रोड)


https://www.facebook.com/Kunal-Jadhav-108981482841014/
वसईत शालेय पुस्तकांच्या नावावर विद्यार्थी-पालकांची बेसुमार लुट

खासगी पुस्तकांवर मनमानी किंमत लावून केली जाते विक्री
10 टक्के सवलतीच्या नावाने विद्यार्थी- पालकांची केली जातेय लूट
सरकारी आणि खासगी पुस्तकांच्या किंमतीत जमीन - आसमानची तफावत

कुणाल जाधव
8976629534

वसई :  मे महिन्याची सुट्टी आता संपत आली असून विद्यार्थ्यांना आता शाळेचे वेध लागले आहेत. हल्ली विद्यार्थ्यांना शाळेची बरीचशी साहित्य (शाळेचे कपडे, वह्या-पुस्तके) शाळेतच मिळत असल्याने बाजारातून विकत घेण्याचा प्रश्‍न उद्भवत नाही. मात्र विद्यार्थी आणि पालक पुस्तकांबाबतीत मात्र शाळांवर निराश असल्याचे दिसत आहेत.
शाळा सुरू होण्यासाठी अवघे 3 दिवस उरले असताना वसई शहरातील इंग्रजी शाळांबाबत काही खुलासे झाले आहेत. या शाळेद्वारा पुस्तकांबाबत विद्यार्थी आणि पालक यांची फसवणूक होत असल्याचे समोर येत आहे. या शाळा सरकारी पुस्तकांना डावलून दुकानदारांशी हातमिळवणी करून पुस्तकांची मनमानी किंमत वाढवून पालकांची लूट करत असल्याचे उघडकीस आले आहे. याबाबत पालकांनी संतापाची भावना व्यक्त केली आहे. 


या शाळा शाळेतूनच पुस्तक घेण्याच्या उद्देशाने दुकानदारांशी हातमिळवणी करून विद्यार्थी आणि पालकांची अक्षरशः लूट करत आहेत, असा आरोप पालकांकडून केला जात आहे
मिळालेल्या माहितीनुसार, सरकारी पुस्तक न घेता दुकानदारांकडून पुस्तकं विकत घेत वाढीव किंमतीत विद्यार्थ्यांना पुस्तक विक्री शाळेकडून केली जाते. ज्यात कमीशन इतके असते की दुकानदार शाळेचे पोट भरल्यानंतरही आलेल्या कमीशनमधून ग्राहकांनी 10 टक्के दिले तरी त्याला 30 टक्के कमीशन सर्व खर्च काढून सहज मिळतात कारण ही सर्व पुस्तके मनु किंवा प्रदिपची असतात. फक्त त्यांच्या नावांमध्ये बदल केला जातो, ज्यात 80 टक्के कमीशन तर येते आणि त्याचबरोबर त्या पुस्तकावर मनमानी किंमत छापु शकतो. ही बाब स्वतःहून एका दुकानदाराने नाव न छापण्याच्या अटीवर उघड केले आहे. ही बाब उघडकीस आणणार्‍या दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, सरकारी पुस्तकांवर फक्त 15 टक्के कमीशन मिळते ज्यात, 2-3 टक्के येण्या-जाण्याच्या प्रवासी खर्चात जातो आणि 13 टक्क्यांमधील दुकानाचा खर्च, कर्मचार्‍यांचा खर्च काढून फक्त 10 टक्के वाचतात. तेच खासगी पुस्तकांवर जवळजवळ 70 ते 80 टक्के कमीशन येते. त्यातील 10 टक्के ग्राहकांना देऊनही शाळेच्या कर्मचार्‍यांचा खर्च काढून 40 टक्के कमीशन सहजासहजी शिल्लक राहते. अशा प्रकारे दुकानदार खासगी पुस्तके सेटिंग करून देतात आणि शाळा त्या पुस्तकांवर आपली मनमानी किंमत छापून शाळेत विद्यार्थ्यांना विकते. 

कशा पद्धतीने चालतो कमीशनचा खेळ
दुकानदाराने दिलेल्या माहितीनुसार, जवळजवळ 4 महिने आधीपासून या गौडबंगालाला सुरूवात होते. खासगी शाळा दुकानदारांशी सेटिंग करून पुस्तकांचे सॅम्पल घेऊन पुस्तके मागवतात. दुकानदार त्याच सॅम्पलची पुस्तके शाळेत पाठवतो ज्याचे, जास्तीत जास्त कमीशन असेल आणि ज्याचे सहजतेने नाव आणि किंमत बदलता येईल. शाळा एक एक करुन सर्व दुकानदारांना शाळेत बोलावून लिस्ट देण्याच्या बदल्यात मोठ्ठी रक्कम वसूल करतात आणि जो जास्त फंड देईल त्यालाच ही लिस्ट लागू होते आणि त्याच पुस्तकाचे नाव बदलण्यात येते. 
दुकानदाराने जो फंड शाळेला दिला, त्या विद्यार्थ्यांच्या पुस्तकांची किंमत दुप्पटीने वाढवून वसूल केला जातो. त्याचबरोबर पुस्तकावरील प्लास्टिकचे कवर बाजारात 7 रुपयाला मिळते ते शाळेत 20 रुपयाला दिले जाते. 
या शाळेत 10 टक्के सवलतीवर विद्यार्थ्यांना पुस्तके विकण्याचा फंडा आहे. जेणे करून विद्यार्थी- पालकांना वाटेल की शाळेत कमी किंमतीत पुस्तके विकली जातात. प्रत्यक्षात मात्र शाळेत दिल्या जाणार्‍या पुस्तकांचा आणि बाजारात त्याच पुस्तकांच्या किंमतीत जमीन- आसमानचा फरक जाणवतो.


https://www.facebook.com/Kunal-Jadhav-108981482841014/